पिकली पानं गळतात... मातीत रुजतात...नवे अंकूर जन्म घेतात...वृक्ष उमलतात...नियतीचं चक्र फिरत राहतं... आणि आपण - आपण हा सोहळा डोळ्यात जागवत जगतो... ते मिटेपर्यंत !
आर्जव
Get link
Facebook
Twitter
Pinterest
Email
Other Apps
पानातून गळला चंद्र साजणी ......
रातीच्या गाली झुले दव .............
वाऱ्याला आली पेंग जराशी .........
मिटली कळी त्या करी आर्जव .....
तळ्याकाठी राहिलेलं आपलं मौन रात्री जेव्हा तळ्यात उतरेल ... चांदणवेलीवर चढून थेट आणि माझ्याशी बोलतं होईल तेव्हा तुझा निश्वास वाऱ्याला आंदण देईल फुलता फुलता राहिलेल्या कळ्या-फुलांचे गुज !
Comments
Post a Comment