रंगपंचमी

या रंगपंचमीला उडणारा पाण्याचा प्रत्येक थेंब -
जाळत जाईल गावच्या गावं
आणि पाडत जाईल खिंडारं
शेकडो वर्ष जपलेल्या
मानवी मनातल्या हळव्या मनो-यास
बरं झालं ते पाहायला
आता वांझ नद्या आपल्यात नाहीत,
बरं झालं हे वहायला
आता डोळ्यातले झरेदेखील नाहीत;
कदाचित म्हणूनच की काय
सगळीककडं अगदी आलबेल आहे.
रहा, तुम्ही तुमच्या मस्तीत रहा
पण लक्षात ठेवा -
ह्या रंगीत अपमानाचं पाणी
मातीत रुजून पुन्हा उगवेल
डोळ्यातल्या झ-यांना आणि
पावसातल्या वा-यांना घेऊन
पुन्हा बरसेल.
ते झेलण्याची ताकद देवाने तुम्हास द्यावी -
अशी भोळसट अपेक्षा मी ठेऊ?
का?

Comments

Popular posts from this blog

सावज !

संधी

मौन